काळ आला होता,पण वेळ आली नव्हती या म्हणीची प्रचिती![](https://adhorekhit.com/wp-content/uploads/2022/11/lll-300x2.jpg)
सांगली । शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या अरविंद सदाशिव हुबाले (वय ४७) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला.पण,शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने शेतकरी बचावला.त्यांना कोणतीही इजा झाली नाही.ही घटना हुबालवाडी हद्दीतील एका शेतात शनिवारी (दि. १२) सकाळी ८ च्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.काळ आला होता,पण वेळ आली नव्हती या म्हणीची यावेळी प्रचिती आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी,हुबालवाडी येथील शेतकरी अरविंद हुबाले हे हुबालवाडी हद्दीत असलेल्या काढाव (ओढ्या शेजारी) उसाला पाणी पाजण्यासाठी सकाळी ८ च्या सुमारास गेले होते.त्यावेळी त्यांना उसाच्या फडात काहीतरी हालचाल होत असल्याचे निदर्शनास आले.गुरगुरण्याचा आवाज आला.
थोडे पुढे गेल्यानंतर त्या फडात बिबट्या दिसला.बिबट्या दिसताच अरविंद हुबाले यांनी भीतीने आरडाओरड सुरु केली.काही कळण्याच्या आत बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेत झडप घालण्याचा प्रयत्न केला.पण,हुबाले सावध असल्याने त्यांनी हा हल्ला चुकवला.जोरदार आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अन् बिबट्याने धूम ठोकली.
वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धावघेतली.त्यांनी तेथील परिसराची पाहणी केली.दरम्यान,तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असून यामध्ये बिबट्याने पाळीव जनावरांसह लोकांवरही हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
हेही वाचा…
Google वरून तुमची सर्च हिस्ट्री हटवा,जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया