पितृपक्ष म्हणजे नेमके काय? वाचा कधी सुरू होणार पितृपंधरवडा आणि त्याचे महत्त्व!
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो.20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष राहील. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते.
प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे.
श्राद्धातील आवश्यक गोष्टी
तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन, या तीन गोष्टी श्राद्धात विशेष आहेत. पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, विशेषतः स्वच्छ भांडी, जवस, तीळ, तांदूळ, कुशा गवत, दूध आणि पाणी तर्पणसाठी आवश्यक आहे. पिंड दानासाठी, तर्पण, तांदूळ आणि उडीद पिठ आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण-कांदा आणि कमी तेल, मिरची-मसाल्याशिवाय सात्विक अन्न तयार करावे. ज्यामध्ये हविष्य अन्न अर्थात भात असावा, म्हणून श्राद्ध पक्षात खीर बनवली जाते.
श्राद्ध कसे करावे (पितृपंधरवडा विशेष)
श्राद्धविधी
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजेच मृत पूर्वज कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते.
अशाप्रकारे करू शकता श्राद्ध आणि तर्पण
- श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्धकर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये. केवळ पाणी पिऊ शकता.
- दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे कुतूप काळात श्राद्ध करावे. जो 11:36 ते 12:34 पर्यंत राहतो.
- दक्षिण दिशेला मुख करून डाव्या पायाचा गुढगा जमिनीला टेकवून बसावे.
- त्यानंतर तांब्याचे खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये जवस, तीळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरे फुल आणि पाणी टाकावे.
- हातामध्ये दर्भ, कुश (एक प्रकारचे गवत) घेऊन पाणी हातामध्ये घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे. ही प्रक्रिया 11 वेळेस करत पितरांचे ध्यान करावे.
- महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे.
- पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. त्यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी.
- त्यांनतर ब्राह्मणांना जेवू घालावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा, इतर सामग्री दान करावी.
श्राद्ध विधीची वेळ –
प्रतिपता श्राद्ध – 21 सप्टेंबर 2021 मंगळवार
प्रतिपदा तिथी प्रारंभ – 21 सप्टेंबर 2021 मंगळवार पहाटे 5.24 वाजता
प्रतिपदा तिथी समाप्ती – 21 सप्टेंबर 2021 मंगळवार पहाटे 5.51 वाजता
कुतुप मुहूर्त – सकाळी 11:50 वाजता ते दुपारी 12:38 वाजेपर्यंत
कालावधी – 49 मिनिटं
रौहिण मुहूर्त – दुपारी 12:38 ते 01:27 वाजेपर्यंत
कालावधी – 49 मिनिटं
अपराह्न काळ – दुपारी 1:27 ते 3:53 वाजेपर्यंत
कालावधी – 2 तास 26 मिनिटं
पितृपक्ष 2021 महत्वाच्या तारखा –
पौर्णिमा श्राद्ध – 20 सप्टेंबर
प्रतिपदा श्राद्ध – 21 सप्टेंबर
द्वितीया श्राद्ध – 22 सप्टेंबर
तृतीया श्राद्ध – 23 सप्टेंबर
चतुर्थी श्राद्ध – 24 सप्टेंबर
पंचमी श्राद्ध – 25 सप्टेंबर
षष्ठी श्राद्ध – 27 सप्टेंबर
सप्तमी श्राद्ध – 28 सप्टेंबर
अष्टमी श्राद्ध – 29 सप्टेंबर
नवमी श्राद्ध – 30 सप्टेंबर
दशमी श्राद्ध – 1 ऑक्टोबर
एकादशी श्राद्ध – 2 ऑक्टोबर
द्वादशी श्राद्ध – 3 ऑक्टोबर
त्रयोदशी श्राद्ध – 4 ऑक्टोबर
चतुर्दशी श्राद्ध – 5 ऑक्टोबर
पितृ पक्षात ही कामे करू नका
या दिवसांत चणे, मसूर, वांगे, कांदा आणि काळे मीठ यांचे सेवन करू नये.
श्राद्धामध्ये नवे कपडे, दागिने तसेच घर आदि गोष्टींची खरेदी करू नये.
रात्रीच्या वेळेस कधीही श्राद्ध घालू नये कारण ही वेळ राक्षसी वेळ मानली जाते.
श्राद्ध कार्यात गायीचे तूप, दूध अथवा दह्याचा वापर केला पाहिजे.
या दरम्यान कोणीही केस अथवा नखे कापू नयेत
पितृ पक्षात घरी कोणतीही व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नये. यासोबतच ब्राम्हणांना जरूर भोजन घालावे.
या कालावधीदरम्यान नियमितपणे देवी देवतांची पूजा करावी.
या दरम्यान झाडं कापू नये. याने पितरं नाराज होऊ शकतात.