सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि. १७ व गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू कुस्ती केंद्रात पुरुष व महिलांची मानधन कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत वाळवा तालुका व कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांनी सहभागी व्हावे,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले. स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी दि.१७ रोजी दुपारी ३ वाजता माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे.
पुरुष मल्लांची स्पर्धा १४ वर्षे,१७ वर्षे व खुल्या गटात होणार आहे.१४ वर्षाखालील गटात ४० किलो,४५ किलो व ५० किलो गट आहेत. १७ वर्षाखालील गटात ५५ किलो व ६० किलो गट आहेत.तर खुल्या गटात ६५ किलो,७० किलो,७५ किलो,८० किलो,८६ किलो,९२ किलो गट आहेत. तसेच महिला मल्लांच्यामध्ये ६१ किलो,६५ किलो,७२ किलो व ७६ किलो गट आहेत. पुरुष मल्लां च्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना,तर महिला गटातील पहिल्या दोन विजेत्यांना आकर्षक रोख रक्कम व सन्मान चिन्ह बक्षिस दिले जाणार आहे.कारखान्याच्या कुस्ती केंद्रात रहाणाऱ्या पुरुष विजेत्या मल्लांना मानधन दिले जाणार आहे.
स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे,तसेच बाद पद्धतीने होणार आहे.मल्लांनी दि.१७ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत नांवे नोंदणी करावी. येताना जन्माचा दाखला,आधार कार्ड आणावे. पंचां चा निर्णय अंतिम राहील.इच्छुक मल्लांनी पै.कुंडलिक गायकवाड (वस्ताद) मो.९८८१५ ५०७७० व नितीन सलगर (वस्ताद) मो. ८६०००८६९५७ यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.
प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने पुन्हा मानधन कुस्ती स्पर्धा!
लोकनेते राजारामबापू पाटील हे बडोदा विद्यापीठात कुस्ती चॅम्पियन होते. त्यांनी नेहमी पैलवानांना प्रोत्साहन दिले.तोच वारसा पुढे नेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर अद्यावत कुस्ती केंद्र उभारून मानधन कुस्ती स्पर्धा सुरू केल्या.मात्र मध्यंतरी बंद असलेली ही स्पर्धा प्रतिकदादा पाटील यांनी पुन्हा सुरू केली आहे.मल्लांनी प्रतिकदादांना धन्यवाद देत या स्पर्धेचे स्वागत केले आहे.