सांगली । उसाला पाहिला हप्ता ३५०० रूपये व तुटलेल्या उसाला ४०० रूपये द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यात पासून चालू असलेल्या ऊस आंदोलन आजही सुरूच ठेवले होते.राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ७० ते ८० ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरत प्रचंड घोषणाबाजी केली.सोमवारी रात्री आठच्या सुमारास इस्लामपूर येथील शंभरी फुटी रस्त्यावर ही वाहने रोखली.
यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांनी वाहने घेऊन जाणारच असा प्रवित्रा घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखान्याचे अधिकारी याचा वाद निर्माण होईल याची इस्लामपूर पोलिसांनी दक्षता घेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील याना तेथे बोलावून घेतले. उद्या पासून ऊसतोड बंद ठेवण्याचे आश्वासन त्यांच्याकडून मिळाल्यानंतर ही वाहने सोडण्यात आली.
वाहतूक रोखण्याल्यामुळे वाहनांच्या रांगा आंबेडकर नाका पर्यंत गेल्या होत्या यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की.आज चक्काजाम आंदोलन केले आहे ,जर ऊस आंदोलनाचा तोडगा नाही निघाला तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता अधिक प्रमाणात सारखेचा भाव ३७०० पुढे आहे.साखर कारखान्यानी आडमुठ्या भुमिका सोडावी अन्यथा होणाऱ्या नुकसानीस कारखाना जबाबदार राहणार आहे.ऊस दराचा संघर्ष अटळ आहे हे कारखान्यानी लक्षात घ्यावे.
यावेळी भागवत जाधव ,जगन्नाथ भोसले,एस् यु सन्दे,प्रकाश देसाई,शिवाजी पाटील,प्रदीप पाटील,प्रभाकर पाटील,संतोष शेळके,प्रकाश माळी,प्रविण पाटील,शहाजी पाटील,प्रकाश माळी,साहेबराव पाटील,उत्तम पाटील,रामचंद्र जाधव,मोहन यादव,अशितोष जाधव,विलास पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी इस्लामपूर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
ऊस दरासाठी बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखणार; आता आरपारची लढाई : राजू शेट्टी यांचा इशारा