सांगली । इस्लामपूर क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित ४० वर्षांवरील इस्लामपूर प्रीमियर टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेत उपांत्य लढतीत के.श्रीकांत संघाने रवी शास्त्री इलेव्हनवर १३ धावांनी विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
इस्लामपूर शहरातील पोलीस कवायत मैदानावर स्पर्धा सुरू आहेत.आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत किरमानी इलेव्हन,अमरनाथ इलेव्हनने प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला.विजेत्या दोन्ही संघात उपांत्य सामना होईल.रवी शास्त्री इलेव्हन व के.श्रीकांत संघाने यांच्यात झालेल्या उपांत्य सामना झाला.
प्रथम फलंदाजी करताना के.श्रीकांत संघाने आठ षटकात ६७ धावा केल्या.या धावांचा पाठलाग करताना रवी शास्त्री इलेव्हनने ५५ धावा केल्या.के.श्रीकांत संघ अंतिम सामन्यात खेळेल.त्याच्या बरोबर किरमानी इलेव्हन विरुद्ध अमरनाथ इलेव्हन यांच्यातील दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेता संघ खेळेल.
शनिवारी सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत रवी शास्त्री संघाने यशपाल शर्मा संघावर १३ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना रवी शास्त्री संघाने ८४ धावा केल्या. उत्तरादाखल यशपाल इलेव्हनने ७१ धावा केल्या. महादेव कालतनिया याने ५४ धावा केल्या. तो सामनावीर ठरला.
रॉजर बिन्नी इलेव्हन संघावर के श्रीकांत इलेव्हनने विजय मिळवला. यात प्रथम फलंदाजी करताना के श्रीकांत संघाने ८३ इतक्या धावा केल्या. रॉजर बिन्नी इलेव्हन संघ फक्त ६६ धावा करू शकला. २६ धावा करणारा मोहन जाधव सामनावीर ठरला.
अमरनाथ इलेव्हन संघावर सुनील गावस्कर इलेव्हनने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गावस्कर इलेव्हनने ७४ धावा केल्या.
अमरनाथ इलेव्हनने हे आव्हान सहज पार केले. शशिकांत सूर्यवंशीने ३५ धावा केल्या तो सामनावीर ठरला.
कपिलदेव संघावर किरमानी इलेव्हनने १० धावांनी विजय मिळवला. किरमानी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ८१ धावा केल्या. चांगल्या गोलंदाजीने कपिलदेव संघाला ७१ धावांवर रोखले. ४६ धावा करणारा अमित परीट सामनावीर ठरला.
पंच म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे महेश पेठकर,धनंजय डुबल,कपिल घस्ते यांच्यासह अमित परीट, शीतल घस्ते,अष्पाक मुल्ला यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून सुनील गुरव, पंडित कोडग, अरविंद कार्वेकर, अजित गायकवाड, दीपक जाधव यांनी काम पाहिले.
इस्लामपूर शहरातील १९९० च्या दशकातील खेळाडूंचा सहभाग
१९९० च्या दशकातील इस्लामपूर शहरातील खेळाडू क्रिकेट लीगमध्ये खेळत आहेत.विजेते पहिले चार संघ चषकाचे मानकरी असतील.इस्लामपूर शहरात सध्या क्रिकेटच्या मैदानावर मुले खेळताना दिसतच नाहीत.मैदानी खेळाचे महत्व वाढवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.