भारताने पाकिस्तानचा 4-0 असा केला पराभव
India vs Pakistan Hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला.हरमनप्रीत सिंगच्या संघाने एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.या विजयासह भारताची अजिंक्य मालिका या स्पर्धेतही कायम आहे.ग्रुप स्टेजनंतर टीम इंडियाने त्यांचे पाचही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.भारताने आधीच उपांत्य फेरीत धडक मारली होती,तर पाकिस्तानचा संघ या पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाची उलटी गिनती सुरू झाली आहे.दोन्ही संघ आशिया चषक आणि त्यानंतर विश्वचषकात भिडतील.त्या सामन्यांना अजून थोडा वेळ असला तरी त्याआधीच भारताच्या पाकिस्तानवर विजयाची आनंदाची बातमी हॉकीच्या मैदानातून आली आहे. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.भारतीय संघाने एकतर्फी 4-0 ने विजय संपादन केला.आशियाई चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते.स्पर्धा खूप उच्च व्होल्टेज होती.
या पराभवासह पाकिस्तान संघाचा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास संपुष्टात आला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते.सामना अनिर्णित राहिला असता,तरी नशिबाच्या जोरावर पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठू शकला असता,मात्र 4-0 अशा पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आणि पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास संपला.
चार क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल
भारतीय संघाने सामन्याच्या चार क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल केला.कर्णधार हरमनप्रीत सिंगने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर केले. त्याचवेळी तिसऱ्या क्वार्टरमध्ये जुगंत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगने मैदानी गोल करत भारताचे विजयाचे अंतर वाढवले.भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने 2 गोल केले.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने चौथा गोल करत पाकिस्तानवर 4-0 अशी आघाडी घेतली.भारताकडून चौथा गोल आकाशदीप सिंगने केला. सामन्यातील हा पहिला मैदानी गोल होता. तत्पूर्वी, तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाले.
हरमनप्रीतचे कमाल
सामना सुरू झाल्यानंतर 2 मिनिटांतच पाकिस्तान संघाला आपण गोल केल्याचे वाटले,पण भारताने रिव्ह्यू घेतला.पाकिस्तानच्या खात्यात गोल जमा झाला नाही.यानंतर भारताने जबरदस्त खेळ केला आणि पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस काही सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत सिंगने पहिला गोल केला.दुसरा गोलही त्याच्या खात्यात गेला.जुगराज सिंगने तिसऱ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल केला आणि सामना संपण्याच्या अवघ्या 5 मिनिटे आधी मनदीप सिंगने केला.भारताने 5 पैकी 3 पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर केले.