कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल, आणि ते तितकेच खरे देखील आहे.चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत.अनेक प्रकारचे त्वचा रोग,दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होते.आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून,थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर ठरते. लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात.
पोटांच्या आजारासाठी
पोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो.अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीशे होण्यास मदत होते.
चेहऱ्यासाठी
चेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.
कान आणि दातासाठी
दात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मजत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
केसांसाठी
कडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. तेंव्हा केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.
त्वचेचे विकार
- कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो. कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.
- या व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबी पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात.
- कडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात.
- डायबिडिस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
- तांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाल टाकला जातो. साठवणुकीच्या धाण्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.
रक्त शुद्ध करण्यासाठी
खराब लाईफस्टाइल सध्या प्रत्येकाची आहे त्यामुळे बऱ्याचदा लोक आजारी असतात. काही आजार हे रक्त शुद्ध नसल्यामुळे होतात. याची लक्षणं चेहऱ्यावर डाग, अॅक्ने, त्वचा रोग इत्यादीमुळे समजायला लागतात. कडूलिंब एक शक्तीशाली औषधी वनस्पती आहे. हे शरीराच्या भागाला आवश्यक पोषक तत्व आणि ऑक्सीजन देण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील हानिकारक आणि दूषित पदार्थांपासून सुटका मिळण्यासाठीही याची मदत होते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोज जेवणाबरोबर नीम कॅप्सूल तुम्ही घेतली तर तुमचं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
डायबिटीससाठी औषध
डायबिटीस अर्थात मधुमेह रोखण्यासाठी आणि साखर नियंत्रणात आणण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा खूप उपयोग होतो हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज कडूलिंबाची पानं रिकाम्या पोटी खाल्ली त्यांची मधुमेहापासून सुटका होऊ शकते.
युरिन इन्फेक्शन होतं दूर
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे युरिन इन्फेक्शन झाल्यास, तुम्ही कडूलिंबाचं सेवन केलंत तर तुम्हाला लवकरच आराम मिळेल.त्यासाठी रोज सकाळी उठून कडूलिंबाची 4 ते 5 पानं चावून खा. आराम मिळेल.
टीप : लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी,कृपया तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)