राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अभ्यासाचे निष्कर्ष
23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी बिछान्यात असताना स्मार्ट फोन वापरतात
अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम
जमिनीचा एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे आवश्यक
नवी दिल्ली |
‘अति तेथे माती’ या प्रचलित मराठी म्हणीप्रमाणे, मोबाईलचा जर आपण अतिवापर केलात,तर त्याचे गंभीर परिणाम आहेत.मोबाईलचा अति वापर हा घातकच आहे.जेव्हा एखादी सवय व्यसनामध्ये रूपांतरित होते तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतातच.लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचे परिणाम (शारीरिक, वर्तनात्मक आणि मानसिक-सामाजिक) हे गंभीर असल्याचे समोर येत आहे. स्मार्ट फोनच्या अति वापरामुळे मुलांची एकाग्रता कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) अलिकडेच “लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचे परिणाम (शारीरिक, वर्तनात्मक आणि मानसिक-सामाजिक)” या विषयावर एक अभ्यास आयोजित केला,ज्यासाठी देशाच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील 5 हजार मुलांची नमुन्यादाखल निवड केली.
या अभ्यासानुसार, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी बिछान्यात असताना स्मार्ट फोन वापरतात, आणि वयानुसार हे प्रमाण वाढते; याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. असाच एक परिणाम म्हणजे मुलांमधील एकाग्रतेची पातळी कमी होते.अभ्यासानुसार, 37.15 टक्के मुलांना नेहमी किंवा वारंवार, स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव येतो.
जमिनीचा एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल,अशी शिफारस राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे केली आहे.
दरम्यान,केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇