सांगली । इस्लामपूर येथील प्रा. डॉ. अरुण घोडके यांच्या “रयतधारा” या ग्रंथास कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठानचा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.मंचर जि. पुणे येथील कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी साहित्य क्षेत्रातील विविध प्रकारासाठी पुरस्कार दिला जातो.
या वर्षीच्या “चरित्र लेखन” या साहित्य प्रकारामध्ये प्रा. डॉ. अरुण घोडके यांच्या ” रयतधारा ” या ग्रंथास पुरस्कार जाहिर झाला आहे.मंचर जि. पुणे येथील या प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. दत्ताजीराव पायमोडे यांनी प्रा. डॉ. अरुण घोडके यांना तसे अधिकृत लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
प्रा. डॉ. अरुण घोडके हे आझाद विद्यालय कासेगांव येथे प्राध्यापक म्हणून सेवेत असुन आजवर त्यांनी पाच हजाराहून अधिक राज्यासह परदेशात व्याख्याने छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर दिलेली आहेत.त्यांना आजवर ६५० हून अधिक पुरस्कारांनी गौरवून सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी त्यांच्या “रयतधारा” या ग्रंथास छत्रपती संभाजीनगर येथील मुक्त सुजन साहित्य पत्रिका पुरस्कार,पाटण येथील स्व. तात्यासाहेब डाकवे साहित्य पुरस्कार,फलटन येथील मानगंगा साहित्य परिषदेचा तसेच शिवाजी कॉलेज सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. याबद्दल डॉ. अरुण घोडके यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.