मुंबई । राजकीय पक्षांनी प्रचार तीव्र केल्याने हेलिकॉप्टरची मागणी वाढली असून महाराष्ट्रात दररोज २५ ते ३० हॅलिकॉप्टरची उड्डाण होत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी चार्टर विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ भारतातील उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त झाली आहे,सर्वच राजकीय पक्ष याचा वापर करताना दिसतात.
जवळपास सर्वच स्टार प्रचारकांच्या रोज दोन ते तीन सभा असतात. मतदारसंघापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, यासाठी हॅलिकॉप्टर सोयीचे पडते. सध्या लोकसभा निवडणुक निकालापर्यंत हॅलिकॉप्टर बुक असल्याची माहिती निर्मिक ॲविएशनचे संचालक सुबोध जाधव यांनी दिली. साधारणपणे दिड ते दोन वर्ष अगोदरच राजकीय पक्ष आपआपली बुकिंग करुन ठेवतात. यात सत्ताधारी पक्षाची बुकिंग सर्वाधिक असते असेही त्यांनी नमुद केले.
दिवसभरात हॅलिकॉप्टर जवळपास ४ ते ५ तासांचे उड्डाण करू शकतात. तर त्यांच्या उडण्यापासून ते जमिनीवर येईपर्यत व इंधन भरणे ही पुर्वतयारी दोन दिवस अगोदर निश्चित करावी लागते.सध्या चार आसनी व दहा आसनी हॅलिकॉप्टरची मागणी असुन निवडणुकीच्या काळात याचे दर ३० टक्क्यापर्यंत वाढतात.
अगदी शेत जमीनीत हॅलिकॉप्टर उतरवता येऊ शकत असल्याने, विशेषत: ग्रामीण भागात सर्वच राजकीय नेत्यांची पसंती निवडणुक प्रचारादरम्यान हॅलिकॉप्टरला असते.
साभार : प्रसार भरती