नवी दिल्ली । ग्रामीण भारतातल्या गावांना समृद्ध गाव आणि स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्यांना लखपती करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यात नैसर्गिक शेती उपक्रमाची अतिशय महत्वाची भूमिका राहणार आहे.
दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (डीएवाय- एनआरएमएल) च्या महिलांकडे कृषी सखी भूमिका सोपवत नैसर्गिक शेतीला अधिक प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय संयुक्तपणे कृषी सखींना प्रशिक्षण देईल.टप्याटप्याने 50,000 कृषी सखींना प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय विविध योजनांमध्ये यांच्या सेवा घेईल. प्रशिक्षणाचा आराखडा तयार करून अंतिम आढाव्यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (एमएएनजीई) ला पाठवण्यात आला आहे.छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी याची मदत होईल.