सांगली । शिक्षक हे कधीच सेवा निवृत होत नसतात.माणिकराव पाटील यांनी त्यांच्या सेवा काळात संस्कारक्षम विद्यार्थी घडवले.त्यांनी आता गावाच्या विकासासाठी पुर्णवेळ द्यावा,असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कापूसखेड (ता. वाळवा) येथील शिक्षक माणिक धोंडीराम पाटील यांच्या सेवानिवृत्त सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी आ.मानसिंगराव नाईक,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील,बाळासाहेब पाटील,संजयबापू पाटील,शिक्षक नेते संभाजीराव थोरात, जयंवतराव पाटील,गटशिक्षण अधिकारी अजिंक्य कुंभार,प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायकराव शिंदे, पाध्यक्षा अनिता काटे,माजी पं.स.सदस्य जयकर नांगरे,सरपंच निवृत्ती माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी माणिकराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
हेही वाचा – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 19 हजार पदांची मेगाभरती
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले,प्राथमिक शाळेतच संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. माणिकराव पाटील हे उपक्रमशिल शिक्षक आहेत. त्यांनी समाजप्रबोधनासाठी पुढे यावे.
उपसरपंच युवराज पाटील,बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील,माजी सरपंच प्रदिप पाटील,जगन्नाथ स्वामी,सोसायटीचे संचालक जयदिप पाटील,राजारामबापू बँकेचे संचालक राजेश पाटील,पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष धनाजी देसाई,माजी अध्यक्ष अशोकराव पाटील,शिक्षक संपतराव पाटील, अशोक धुमाळे,भरत मोकाशी,राहुल मोरे,प्रताप पाटील,शरद कु-हाडे,जालिंदर यादव,माणिकराव पाटील,किसन पाटील,संजय तोडकर,विजय पाटील,संजय साळुंखे,संगिता सुपने,मधुमती पाटील,वासंती पाटील,सुवर्णा पाटील,रेखा धुमाळे,भारती क्षिरसागर,दिलीप पाटील,सीमा पाटील,पत्रकार राजेंद्र पाटील, दिपक देशमुख,प्रविण पाटील,मोहित पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,पाणीपुरवठयाचे संचालक,सर्व सोसायटीचे संचालक,शिक्षक,ग्रामस्थ उपस्थित होते.