कामेगौडा या मेंढपाळाने बकऱ्यांना चारता-चारता खोदले १४ तलाव, ४० वर्षांपूर्वी सुरूवात
नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरे कामेगौडा या व्यक्तीचा उल्लेख केला.कामेगौडा कोण?थोडी उत्सुकता जागी झाली आणि म्हटले जाणून घ्यावे नक्की कोण आहे हा अवलिया!
जगात काही घडू शकते,असे आपण बरेच वेळा म्हणतो आणि त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात बिहारच्या दशरथ मांझीने पहाड खोदून मार्ग तयार केला होता,अगदी त्याच्यावर एक हिंदी चित्रपटही येऊन गेला.अशाच एखाद्या चित्रपटाला साजेशी कामगिरी कामेगौडा यांची आहे.एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले या ८५ वर्षांच्या अवलियाने! कामेगौडा यांचे घर कर्नाटक येथील मांड्या गावातील डासनाडोड्डीमध्ये आहे.ते मेंढपाळ असून कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढी चरवतात.
४० वर्षांपूर्वी ते जेव्हा मेंढ्या डोंगरावर चरायला जात,तेव्हा तेथे जनावरांना प्यायला पाणी नसल्याचे त्यांना लक्षात आले.पहाडी जागा असल्याने तेथे पावसाचे पाणी जमा होत नसे.तेव्हा त्यांच्या डोक्यात तलाव बनवण्याची कल्पना आली.सुरवातीला ते काठीने खड्डा खोदत. मात्र ते त्यांना कठीण जाऊ लागले. म्हणून त्यांनी काही अवजार विकत घेण्याचे ठरवले .
आता मेंढपाळाकडे कुठले आले इतके पैसे? मग त्यांनी काही मेंढ्या विकून अवजार विकत घेतले व खड्डे तयार करण्याचे काम सुरु ठेवले. पावसाळा आला, खड्ड्यांचे रूपांतर तलावात झाले. जनावरांना पाणी मिळू लागलं तसा कामगौडा यांचा उत्साह वाढू लागला.लोकांच्या टिंगल टवाळीकडे लक्ष न देता त्यांनी नव्या जोमाने त्यांनी अजून काही तलाव खोदले.त्यांनी २०१७ पर्यंत केवळ सहा तलाव बनवले होते मात्र गेल्या एक-दीड वर्षात लोकसहभागामुळे ही संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली.त्यांनी बनवलेले १४ तलाव हे एकमेकांशी जोडलेले आहेत,हे विशेष..!
तसेच त्यांनी डोंगरावर जवळपास २ हजार वडाची झाडं देखील लावली आहेत.त्यांना या कार्यासाठी अनेक बक्षिसे मिळाली आणि जे पैसे मिळाले ते त्यांनी पुन्हा तलावांच्या निर्मितीसाठी वापरले.
कामेगौडा आज ही त्यांचे काम करत आहेत.त्यांचे घर डासनाडोड्डीमध्ये असून त्यांचा परिवार झोपडीत राहतो.कामेगौडा हे कुंदिनीबेट्टा गावाजवळ बकऱ्या चारतात.केरे सांगतात, मी सुरवातीला काठीने खड्डा खोदायचो हे खूप कठीण काम होत.त्यानंतर मी माझ्या जवळील काही मेंढ्या विकून खड्डे खोदण्यासाठी अवजारे विकत घेतली,आणि काम सुरु केले. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळतयं हे माझ्या लक्षात आले. हे पाहून मी माझ काम सुरू ठेवले.
कामेगौडा यांचा मुलगा म्हणतो,कुठलेही शिक्षण न झालेल्या माझ्या वडिलांनी पाण्याचा प्रवाह आणि इतर टेक्निक विकसित करून घेतल्या. माझे वडिल फक्त रात्री घरी येतात,दिवसभर ते डोंगरावरील आपली झाडे आणि तलावांची काळजी घेत असतात.त्यांनी स्वतःला या कामात एवढे झोकून दिले आहे की, ते ८५ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असे न थकता काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याकडून अशा योग्य समाजरत्नांचा उल्लेख होतोय आणि त्यांचा यथोचित गौरव होत आहे,हे पाहून मनाला समाधान वाटत आहे. आपल्या ही आजूबाजूला असे अनेक दुर्लक्षित मांझी,कामेगौडा काम करत असतात,त्या सर्वांच्या कार्यास मनापासून सलाम..!
One Comment
ULWVixvZq
cheap cialis no prescription Lasix free Horseracing