श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेध
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल.त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल”, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल…त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”