मुंबई ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे.
तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.