सांगली ।
ढोलकं रं,निसर्ग राजा,अश्विनी ये ना या मराठा मोळ्या गाण्यापासून निले निले अंबर पे,जिंदगी कुछ भी नही,सत्यम शिवम सुंदरम अशी एकापेक्षा एक सरस हिंदी-मराठी गाणी,आणि नृत्याविष्काराने इस्लामपूरकर कलारसिक मंत्रमुग्ध झाले.आविष्कार कल्चरल ग्रुपने प्रा.राजेश सरकटे निर्मित ‘स्वर विहार’चे आयोजन केले होते. १८ व्या संगीत महोत्सवातील हा उर्वरित चौथा कार्यक्रम होता. कोरोनाचे महासंकट व सचिव राजेंद्र घोरपडे (भाऊ),माजी अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या निधनानंतर पहिला कार्यक्रम देत आविष्कारने पुनरागमन केले. जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,अँड.युवा नेते प्रतिकदादा पाटील,बी. एस.पाटील,उद्योजक अनिल जाहीर यांच्या सह हजारो कला रसिकांनी ‘स्वर विहार’चा आनंद लुटला.
प्रसिध्द गायक प्रा.राजेश सरकटे,गायिका कल्याणी देशपांडे (पुणे),स्वरना शिंदे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘दिल दिया है’,तर समारोप ‘ए देश है,वीर जवानोंका’या देशभक्ती पर गीतांनी केली. काळ्या मातीत मातीत, अधीर मन हे झाले आदी मराठमोळी गाणी सादर केली. तर अगर तुम ना होते,तेरे जैसा यार कहा,प्यार दिवाना होता है,सोचेंगे तुमे प्यार करते नही,मुझे नवलखा मंगा दे ओ सया दिवाने (शराबी) आदी हिंदी गीते सादर केली. मध्ये-मध्ये अतुल कुलकर्णी व सहकाऱ्यांनी विविध गाण्यावर बहारदार नृत्याविष्कार केला. इस्लामपूरच्या ज्ञानेश्वरी देशपांडे-पाटील यांनी राजेश सरकटे यांच्या समवेत ‘गाता रहे मेरा दिल’हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यांचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.ते म्हणाले,आविष्कारने १८ वर्षात सांस्कृतिक चळवळ उभा केली.मात्र कोरोनाचे संकट व दोन खंदया कार्यकर्त्यांच्या निधनाने निराशा आली होती. आपण पुन्हा पुनरागमन करीत आहात. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभा आहोत. यावेळी युवा नेते प्रतिकदादा प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे,वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव अँड.बी.एस.पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक अनिल जाहीर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी कार्याध्यक्ष नजीर शेख यांनी प्रास्ताविक भाषणात आविष्कार डिसेंबरमध्ये १९ वा संगीत महोत्सव घेत असल्याची घोषणा केली.
माजी अँड.धैर्यशील पाटील,जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,शहाजी पाटील,खंडेराव जाधव,संग्राम जाधव,संचालक विराज शिंदे, प्रांताधिकारी डॉ.संपतराव खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे,मुख्याधिकारी वैभव साबळे,शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, डॉ.सतीश गोसावी,विकास कर्डीले,एस.डी. कोरडे,शशिकांत पाटील,सुहास पाटील,रोझा किणीकर यांच्यासह हजारो कला रसिकांनी स्वर विहारचा आनंद लुटला.
आविष्कारचे मोहन चव्हाण,सुनील चव्हाण,प्रा.प्रदीप पाटील,भूषण शहा,राजेंद्र माळी,विश्वनाथ पाटसुते,विजय लाड, प्रा.कृष्णा मंडले,सतीश पाटील,धनंजय भोसले,अजय थोरात,विजय नायकल,सचिन शिंगटे यांच्यासह ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. सदानंद गाडगीळ सांगली यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन केले.
घोरपडेभाऊ,सुधीर पाटील यांना अभिवादन
आविष्कारचे सचिव राजेंद्र घोरपडे (भाऊ),माजी अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या अकाली निधनानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांना विनम्र अभिवादन करणारे डिजिटल लावले होते. ना.पाटील,गायक सरकटे यांनी त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. नजीर शेख यांनी प्रास्ताविक मध्ये,सदानंद गाडगीळ यांनी सूत्र संचालन करताना,तसेच बऱ्याच सभासदांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील ही त्यांची मुले आविष्कारमध्ये सक्रिय आहेत. ना.पाटील यांनीही त्यांची आस्थेवाईक चौकशी केली.