नवी दिल्ली । भारत आता आधुनिक जगातल्या सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान राजधान्यांपैकी एक आहे.या क्षेत्रातल्या जगभरातल्या प्रमुख कंपन्यांचे भारतात अस्तित्व आहे.भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या निर्मितीच्या दिशेने होत असलेली वृद्धी आणि मोबाईल फोनसाठी उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना (पीएलआय) च्या यशाच्या आधारावर मे 2023 मध्ये सरकारने आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना- 2.0 ला मंजुरी दिली.
योजनेमध्ये लॅपटॉप, टॅब, ऑल-इन-वन पीसी,सर्वर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर या उपकरणांचा समावेश आहे.सरकारने आता 27 आयटी हार्डवेअर उत्पादकांच्या अर्जांना मंजुरी दिली आहे.
नामांकित कंपन्यांच्या हार्डवेअर निर्मितीच्या भारतातल्या सुरवातीमुळे 50 हजार थेट रोजगारासह सुमारे 2 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.सुमारे 3.50 लाख कोटी रुपयांचे आयटी हार्डवेअरचे उत्पादन होईल ज्यामध्ये कंपन्या सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.
या 27 अर्जदारांपैकी 23 तात्काळ निर्मिती सुरु करण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.