भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची माहिती
सांगली । भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातुन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिना निमित्त संपुर्ण देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना व स्वातंत्र्यलढयाच्या स्मृती प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम रूजाव्यात,स्वातंत्र्य लढयातील क्रांतीकारकांचा इतिहास नव्या पिढीला समजावा या पवित्र उद्देश्याने हर घर तिरंगा,मेरी माटी,मेरा देश,फाळणी दिन-विभाजन विभिषिका स्मृती दिवस असे कार्यक्रम सांगली जिल्हयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.या कार्यक्रमामध्ये प्रत्येक नागरिक सहभागी होईल अशी माहिती भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री,मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, हर घर तिरंगा हे अभियान गत वर्षी 15 ऑगस्टला राबविण्यात आले होते.या अभियानाला संपुर्ण देशभरातुन मोठा प्रतिसाद मिळाला.आपल्या देशाबद्दल असणारा अभिमान आणि स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा हे अभियान याही वर्षी संपुर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या निमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये युवक मोटार सायकल रॅली काढुन हर घर तिरंगा या अभियानाबाबत जनजागृती करतील.
मेरी माटी, मेरा देश हे अभियान देशातील प्रत्येक गावात राबविण्यात येणार असुन स्वातंत्र्य लढयात याच मातीतील अनेक क्रांतीकारकांनी योगदान दिले आहे.त्या अनुषंगाने प्रत्येक गावातील क्रांतीकारकांची नावे,स्वातंत्र्य सैनिकांची नावे याची माहिती असलेला शिलाफलक प्रत्येक गावात प्रशासनाच्या वतीने लावण्यात येणार आहे.यामुळे नव्या पिढीला या क्रांतीकारकांची नव्याने ओळख होवुन त्यांच्या स्वातंत्र्य लढयातील योगदानाचे महत्व समजेल,प्रत्येक गावातील माती एका कलशामध्ये एकत्रित करून तालुका स्तर, राज्य स्तर येथे एकत्र हेावुन 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचविण्यात येणार आहेत.प्रत्येक तालुक्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते 75 वृक्षांचे रोपन करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेणार आहेत.
फाळणी दिन-विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणुन 13 व 14 ऑगस्ट रोजी संपुर्ण सांगली जिल्हयामध्ये साजरा करण्यात येणार आहे.दरम्यान,स्वातंत्र्य लढयात योगदान दिलेल्या क्रांतीकारकांच्या पुतळयाला अभिवादन करून ठिकठिकाणी मुख यात्रा काढण्यात येणार आहेत.यावेळी स्मारकांच्या ठिकाणी देश भक्तीपर गीते व क्रांतीकारकांच इतिहासाबद्दल माहिती देण्यात येणार असल्याची माहिती शेवटी निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
यावेळी सांगली शहर भाजपा अध्यक्ष प्रकाश ढंग,सांगली जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मिलींद कोरे,सांगली विधानसभा प्रमुख शेखर इनामदार, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रभारी सत्यजीत देशमुख, कडेगाव-पलुस विधानसभा प्रमुख संग्राम देशमुख(भाऊ), तासगाव विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील, आटपाडी विधानसभा प्रमुख अमरसिंह देशमुख,शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट महाडीक,मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडेसर,जत विधानसभा प्रमुख तम्मनगौंडा रविपाटील,शुभम कुलकर्णी,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थितांनी पंचप्राण शपथ घेवुन देश हिताचा संदेश दिला.