कास पठारावरील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
घनदाट जंगल आणि दुर्मिळ सुंदर वनस्पती असलेले कास पठार आरक्षित वन हे एकदा तरी पाहण्यासारखे आहे. हे आरक्षित वन साताऱ्यापासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या महाराष्ट्रातील पठारावर फुलांची दरी (फ्लॉवर व्हॅली) आहे. 2012 मध्ये हे वन युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित केले. रंगीबेरंगी फुले व वनांनी व्यापलेल्या कास पठारावर फुलांच्या एकूण 850 आणि 33 दुर्मिळ प्रजाती आहेत. कास पठाराचे खोरे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फुलून येते. इथून कोयना अभयारण्याचे मनोहर दृश्य सुद्धा दिसते.
पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान हलका पाऊस असल्याने या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असते. पठाराभोवती शक्यतो चालत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पठाराजवळ संध्याकाळच्या वेळेला कँम्पिंग सुद्धा करू शकता जिथून तुम्हाला काजव्यांचे अत्यंत नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळेल.
अलीकडील काही वर्षात पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येक जण तेथील फुलांकडे आपोआपच आकर्षित होतो. दरवर्षी देश – विदेशातील शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी कास पठारला भेट देतात.पावसाळ्यानंतर आठ-पंधरा दिवसांनी या पठारावरील हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग लाल,पिवळा,निळा,पांढरा अशा अनेक रंगामध्ये बदलतो.
जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रंगीबेरंगी रान फुलांनी बहरू लागले आहे. सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास पठारावर सध्या वेगवेगळी आकर्षक फुले येण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावरील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या तेरडा, हत्ती, गौरी, पांजाळ, व्हाइट गेंद , चवर, कर्णफूल, रानजिरे यांसह अनेक प्रकारच्या फुलांची चादर पठारावर सध्या पसरली आहे.
यावर्षी फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने पठारावर आठवडाभरात चांगला फुलांचा बहर पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने निसर्गाचा ऱ्हास होऊ नये याचा विचार करून पर्यटकांसाठी प्रथमच ई-बसची सुविधा करून दिली आहे.
कास पठारावरील अनेक पाईंट दुर्लक्षित
निसर्गाचा अद्भूत खजिना असलेल्या कास पठारावरील दुर्मिळ वनस्पती, विविध जातींच्या फुलांमुळे पठार जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. विस्तीर्ण कास पठारावरील मंडपघळ, प्राचीन गुहा, कुमुदनी तलाव, सज्जनगड पॉईंटसारखे अनेक पर्यटन पॉईंट्स दुर्लक्षित आहेत. लाकडी मनोर्यावरून दिसणारा कास तलावाचा जलशय, छोटे छोटे धबधबे पाहण्याची संधी पर्यटकांना पर्यटन हंगामात मिळणार आहे.
कास पठार जायचे अंतर
- सातारा पासून – 22 किमी
- पुण्यापासून – 125 किमी
- मुंबई पासून – 280 किमी
- कोल्हापूर पासून – 150 किमी
- सांगली पासून – 147 किमी
कास पठार आरक्षित वन साताऱ्याजवळ आहे आणि स्वतःचे वाहन असल्यास तुम्ही तिथे सहज जाऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा रेल्वे स्टेशन आणि सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे.
आपण अधिकृत कास वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकता. बुकिंग साठी खालील लिंक वर क्लिक करा- official Kaas website
कासमध्ये खासगी वाहनांना परवानगी नाही. एकदा आपण पोहोचल्यानंतर आपल्याला आत नेण्यासाठी सरकारी वाहतूक उपलब्ध आहे.
कास पठारावर जैवविविधता
कास पठार त्याच्या जैवविविधतेने समृद्ध आहे. बोटॅनिकल सायन्ससाठी नवीन असलेल्या पठारावर बर्याच प्रजाती पाळल्या जातात. पठारावर अनेक स्थानिक, लुप्तप्राय वनस्पती आढळतात. पठारावर 850 हून अधिक प्रजातीच्या फुलांच्या रोपांची नोंद आहे. रेड डेटा बुकमध्ये 624 प्रजाती दाखल झाल्या आहेत. या 624 प्रजातींपैकी 39 प्रजाती केवळ कास प्रदेशात आढळतात.वनस्पति विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे कास पठार हे वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल. गेल्या 4-5 वर्षात हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे.
या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयनेचा जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला, अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जलक्रिडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसीत करण्यात येत आहे.
बुकिंग साठी खालील लिंक वर क्लिक करा- official Kaas website