Last Updated on 08 Dec 2024 5:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निरोगी जीवनशैलीची सुरुवात जेवणाच्या ताटातील वैविध्यपूर्ण पदार्थापासून सुरू होते. धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करता, आपला आहार शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्त्वांसह, म्हणजे, कर्बोदक, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असला पाहिजे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी जेवणाचे ताटही तेवढेच सुंदर आणि वैविध्यपूर्ण पदार्थ आणि फळांनी सजलेले असले पाहिजे.
सात्विक आहारामुळे आरोग्याचे फायदे होतात. अन्नातून ऊर्जा मिळते. स्नायू बळकट होतात. ऋतुमानातील संक्रमणाशी लढण्यास मदत करतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात. त्यामुळे जेवणात विविध खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने उत्साही रंग आणि चव येतात आणि पौष्टिक मूल्ये मिळतात. म्हणूनच विविध पदार्थांसह संतुलित आहाराची आवश्यकता असते.
प्लेटमध्ये विविधता आणण्यासाठी, विविध खाद्यपदार्थ आणि फ्लेवर्स एकत्र करून ते संतुलित करण्यावर लक्ष केंद्रित करा. चव आणि पौष्टिकता सुधारण्यासाठी ताटात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करा, जेणेकरून प्रत्येक जेवण अधिक रुचकर आणि आरोग्यदायी होईल. निरोगी थाळी योग्य पोषणासाठीची पूर्वअट ठरते जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि शारीरिक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असते. आपले जेवणाचे ताट विविध खाद्यपदार्थांनी सजवा.
आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक आहारामुळे आपल्या शरीराला आवश्यक इंधन मिळते. आहारात सर्व घटक असल्याची खात्री करा. धान्यही हुशारीने निवडा.
तज्ज्ञांच्या मते, जेवणात विविधता आणण्यासाठी, संपूर्ण धान्य आणि शेंगदाण्यांबरोबरच पातळ प्रथिने, दुग्धजन्य पदार्थ आणि भरपूर रंगीबेरंगी फळे आणि भाज्या यांचे मिश्रण असले पाहिजे. क्विनोआ, बाजरी, बार्ली, फारो किंवा तपकिरी तांदूळ यांसारखे संपूर्ण धान्य वापरून संतुलित जेवण तयार करा. संपूर्ण धान्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर, पचनास मदत करतात. त्यामुळे जेवणाची तृप्तता मिळते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले, तरी अनेकदा केवळ कष्ट करूनही अप... Read more
- काळी जादू : वास्तव काय? अंधश्रद्धा की अदृश्य शक्ती
- कृष्णा कारखान्याचा विकास, सभासदांचे हित हेच ध्येय
- महाराष्ट्रातील सरकारी भरती प्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय
- ‘सूरसम्राज्ञी’ आशा भोसले यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- ‘जुनेखेड पॅटर्न’: ग्रामविकासाचा पारदर्शक आरसा; शासनाने राज्यभर अंमलबजावणी करण्याची गरज
- महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हंगामी आणि स्थानिक उत्पादने फायद्याची
पौष्टिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात स्थानिक, हंगामी आणि ताजे पदार्थ समाविष्ट केले तर ते अधिक चांगले असते. पालकासारख्या पालेभाज्या, बीटरूट, गाजर किंवा रताळीसारख्या भाज्या, ब्रोकोली किंवा ब्रसेल्स स्प्राउट्स सारख्या कुसीफेरस भाज्यांचे मिश्रण असू द्या. कारण ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवतात.
विविधरंगी भाज्यांचा समावेश केल्यामुळे सर्वोत्तम अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे मिळतात. संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी देणाऱ्या पदार्थापासून ते विविध भाज्यांपासून आरोग्याचे अद्वितीय फायदे होतात. आपल्या ताटाचा एक चतुर्थांश भाग हा प्रथिनांनी व्यापलेला असावा, जो उती संवर्धन, वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. आणि एक चतुर्थांश भाग ऊर्जा देणाऱ्या धान्यपदार्थानी युक्त असला पाहिजे. अशा संतुलित आहारामुळे शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. उत्तम आरोग्य राहिल्यामुळे चैतन्य निर्माण होते. त्याचा परिणाम आपली मनःस्थिती स्थिर राहण्याबरोबरच कार्यक्षमता वाढीला मदत होते.
जेवणात केवळ मांसाचा समावेश करण्याऐवजी अंडी, बीन्स, मसूर आणि हरभरा डाळीसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा विचार करा. याव्यतिरिक्त मासे आणि चिकन हाही उत्तम पर्याय आहे. बीन्स किंवा सोयासारखे प्रथिनेयुक्त पदार्थही आरोग्यदायी ठरतात. दह्यासारख्या आंबवलेल्या पदार्थामुळे आतडी निरोगी राहतात. पोषक तत्त्वे वाढून आतड्यांचे आरोग्य सुधारते. अतिरिक्त पोषणासाठी मसाल्यांचा समावेश तर अपरिहार्यच ठरतो. एकूणच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी जेवणाचे ताटही तेवढेच सुंदर आणि वैविध्यपूर्ण पदार्थ आणि फळांनी सजलेले असले पाहिजे.












































































