Last Updated on 13 Feb 2025 8:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी, असे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी सांगितले.
मंत्रालयात मनरेगा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सचिव गणेश पाटील, उपसचिव ज. जि. वळवी तसेच विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुशल आणि अकुशल कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच धडक सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीच्या अडचणी असल्यास तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. गोगावले यांनी दिले.
पीटीओची (प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर) माहिती सादर करण्याचे तसेच राबविण्याचे विभागातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात आणि १०० दिवसांत पूर्ण करावयाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश रोहयो मंत्री गोगावले यांनी दिले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरा... Read more












































































