सांगली । इस्लामपूर येथे आंबा, कडधान्ये महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली.27 मेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले.आहेत.या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांचे 50 स्टॉल्स आहेत.
इस्लामपूर येथील रत्ना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने दि.23 ते 27 मे या कालावधीत कृषी मॉल,वाघवाडी रोड (ता. वाळवा) येथे फळे,कडधान्य व आंबा महोत्सव आयोजित केला आहे,सदर फळे व धान्य महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील धान्य उत्पादक व फळ उत्पादक शेतकरी यांचेसाठी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ५० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.याठिकाणी महिला बचत गटांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले असून यामध्ये कडधान्यापासून केलेले पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, फळे, विविध जातीचे आंबे उपलब्ध आहेत.
महोत्सवाचे उदघाटन तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील,’आत्मा’चे नागेश जमदाडे,कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुजित मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे,मंडल कृषी अधिकारी सतीश पाटील,कृषि सहायक अक्षय राजमाने,रवी सूर्यवंशी,प्रशांत मोरे,शशी गवळी आदी उपस्थित होते.यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 17 रक्तदात्यांची रक्तदान केले.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा ![](https://adhorekhit.com/wp-content/uploads/2024/01/lll-1-300x2.jpg)
सर्व सामान्यांना चांगल्या प्रतीची फळे, कडधान्ये व दर्जेदार आंबा उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांना देखील बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. शेतकऱ्यांनी या महोत्सवात फळे, कडधान्ये व आंबाविक्रीसाठी आणावा. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभाग कोल्हापूर, यांनी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केलेला आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सदर महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभव कोकाटे यांनी केले आहे.