सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या चार वर्षात २०० हुन अधिक रुग्णांवर यशस्वी कृत्रिम सांधेरोपन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अस्थिरोग आणि सांधेरोपन तज्ञ डॉ. जयदीप पाटील यांनी दिली.
डॉ.जयदीप पाटील म्हणाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना प्रकाश हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दररोज हजारो रुग्ण या आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत. रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार होत आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून २०० हुन अधिक रुग्णांवर यशस्वी कृत्रिम सांधेरोपन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्जरीबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला खाली-वर उठ-बस करता येते. परंतु कृत्रिम सांध्यामध्ये झीज जास्त प्रमाणात होऊ शकते म्हणून डॉक्टर रुग्णाला चौड्यावर न बसता मांडी घालून बसण्याचा सल्ला देतात.
गुडघ्याची जर जास्त प्रमाणात झीज झाली असल्यास ४५ ते ५० या वयापर्यंत आपण सांधेरोपन शस्त्रक्रिया करू शकतो. रुग्णाला बीपी, मधुमेह असला तरीही ते कंट्रोल करून ही शस्त्रक्रिया होऊ शकते. शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या दिवसापासून रुग्ण पूर्ण वजन देऊन चालू शकतो व गुडघा वाकवूही शकतो. कृत्रिम सांध्याचे आयुष्यमान विदेशी सांधा वापरल्यानंतर २५ ते ३० वर्षे एवढे असते. त्यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही.
प्रकाश हॉस्पिटलमध्ये कृत्रिम सांधेरोपन शस्त्रक्रिया विभागामध्ये तज्ञ अनुभवी प्रशिक्षित स्टाफ पूर्णवेळ उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यास मदत होते. तरी प्रकाश हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सांधेरोपन शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होत आहे. तरी रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.