स्वाभिमानी आक्रमक…पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात
कोल्हापूर । ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी पुणे-बेंगलोर महामार्गावरील चक्का जाम करण्यासाठी शिरोली नाक्यावर एकवटले आहेत.महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर आता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे.ऊसदर प्रश्नी मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात बोलावलेली बैठक निष्फळ ठरली या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही.ही बैठक निष्फळ ठरली.दरम्यान,मागील हंगामातील तुटलेल्या उसाला 400 रुपयेऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता.
मात्र, कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली.राजू शेट्टी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी पुणे-बेंगलोर महामार्गावरील चक्का जाम करण्यासाठी शिरोली नाक्यावर एकवटले आहेत.परंतु,पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरला आहे.आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एकटे पाडले नसल्याचे सांगितले.
दरम्यान,स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर येथे रास्ता रोको करण्याचा इशारादिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वाभिमानीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची रातोरात धरपकड चालवली आहे.
दरम्यान,कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्यावतीने कालपासूनच जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला.कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवली आहे.तर कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी शिये कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.तसेच जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.