इस्लामपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन
सांगली । तांबवे येथील वयोवृद्ध शेतकरी शंकर हरी पाटील (आण्णा) यांनी आज इस्लामपूर येथील चक्काजाम आंदोलनात पुन्हा एकदा ऊसदर प्रश्नी रोखठोक भूमिका मांडली.शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे गेले कुठे असा सवाल करत शेवटचं सांगतो ऊसतोडी घेऊ नका.कारखानदारांची हुकूमशाही मोडीत काढा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शेतकरी भावांनो, ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस देऊ नका.मागच्या हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर घेतल्याशिवाय ऊसाच्या कांड्या विकू नका असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
इस्लामपूर येथे ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात तांबवे येथील वयोवृद्ध शेतकरी शंकर हरी पाटील (आण्णा) सहभागी झाले होते.त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी पोटतिडकीने आपल्या भावना मांडल्या.दोनच दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बहे (ता. वाळवा) येथील ऊस आंदोलनातील रोखठोक भूमिका मांडतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला होता.आज पुन्हा इस्लामपूर येथेही त्यांनी साखर कारखानदारांवर तिखट शब्दात आसूड ओढले.
हेही वाचा – ऊस आंदोलन पेटलं; वेगवेगळ्या मार्गांवर चक्काजाम आंदोलन
ते म्हणाले,.कुठं गेलं पैसं,हिशोब करा…काय करायचं आम्ही,सहा वर्षे झालं तीन हजारच देत्याती,मळीचं नाह्यती, दारूचं पैसं नाह्यती,बगॅस नाय,अल्कोहोल नाय…कुठं गेलं पैसं…का फक्त एफआरपी असे अनेक सवाल करत वयोवृद्ध शेतकरी पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
या आंदोलनात भागवत जाधव.शहाजी पाटील,सागर पाटील,युवराज निकम,जगन्नाथ भोसले,यशवंत पाटील,आप्पासाहेब पाटील,एस् यु सन्दे,प्रकाश देसाई,शिवाजी पाटील,प्रदीप पाटील,प्रभाकर पाटील,काशिनाथ निंबाळकर,संतोष शेळके,सतिश सावंत,पद्माकर पाटील,शशिकांत पाटील,आप्पा पेठकर,रविकिरण माने,प्रकाश माळी प्रविण पाटील,एकनाथ निकम,प्रकाश माळी,प्रविण पाटील,शिवाजी मोरे,साहेबराव पाटील,उत्तम पाटील,रामचंद्र जाधव, आनंदराव पाटील,सुभाष पवार बाबासाहेब पाटील,अशितोष जाधव आदी सहभागी झाले होते.
शंकरअण्णांनी रोखठोक भुमिका मांडलेला व्हिडीओ पहा :