सांगली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतुन भारत देशाची चौफेर प्रगती सुरु आहे,सर्वस्तरातील घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मोदीसाहेबांचा आहे,देशाच्या प्रगती मध्ये युवकांचे योगदान मोलाचे असल्याचे मत सांगली जिल्हा किसान मोर्चा चे अध्यक्ष परशुराम नागरगोजे बापु यांनी व्यक्त केले.
मोदी @ 9 जनसंपर्क अभियान कार्यक्रम अंतर्गत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचा मेळावा प्रकाश शिक्षण,आरोग्य संकुलात संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते,अध्यक्षस्थानी माजी आ.भगवानराव सांळुखे होते.
यावेळी माजी आ.भगवानराव सांळुखे,सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पै.रोहीत पाटील,कडेगांव तालुका भाजपाचे नेते विजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या सोशल मिडीयातील युवकांना टेक्नीकल मार्गदर्शन इंजि. सुजित पाटील,भाजपा सोशल मिडीया प्रमुख रोहीत पाटील यांनी केले.
या मेळाव्यासाठी डाॅ.सतिश बापट,वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष निवास पाटील,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,किल्लेमच्छिंन्द्र गड चे शशीकांत सांळुखे,भडकंबेचे आनंदराव पाटील,विकास पाटील,नाथगौंडा पाटील,अनिल सरदेशमुख,विक्रम शिंदे,संदीपराज पवार,गौरव खेतमर,अल्ताफ तहसीलदार,गजानन पाटील,अनिकेत पाटील,सुयश पाटील,शरद अवसरे,पोपट पवार,सुभाष जगताप,शिरीष रसाळ,रविंद्र चव्हाण आदिसह वाळवा तालुका सोशल मीडिया चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केले,आभार भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत यांनी मानले.