Last Updated on 01 Feb 2022 8:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की 2022-23 या वर्षात राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती २५ हजार किलोमीटरने वाढवली जाईल. संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी म्हटले की सरकार राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारासाठी वचनबद्ध आहे आणि येत्या आर्थिक वर्षात सुमारे 25 हजार किलोमीटर जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यासोबतच डोंगराळ भागातील उंच ठिकाणांना जोडण्यासाठी रोपवेचा विकास आराखडाही सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीतारामन म्हणाल्या की,2022-23 मध्ये मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क देखील उभारले जातील.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यंदाचा अर्थसंकल्प शाश्वत विकासाला चालना देईल.2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या की आर्थिक पुनरुज्जीवनाचा सार्वजनिक गुंतवणूक आणि भांडवली खर्चाचा फायदा झाला आहे. सीतारामन म्हणाल्या, सर्वसमावेशक वाढ, उत्पादकता वाढ, ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाययोजना हे विकासाचे चार स्तंभ आहेत. पीएम गति शक्ती मास्टर प्लॅन विकासाच्या सात इंजिनांवर आधारित आहे. अशी अधिक माहिती त्यांनी दिली.
चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सीतारामन म्हणाल्या की, देशातील आर्थिक बाबी वेगाने सुरू झाल्यामुळे 2021-22 या वर्षासाठी विकास दर 9.2 टक्के असू शकतो. त्या म्हणाल्या की भांडवली खर्च आणि खाजगी गुंतवणुकीतील पुनर्प्राप्तीमुळे गुंतवणुकीची सक्षम फेरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.











































































