Last Updated on 03 Nov 2022 1:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,असा विश्वास व्यक्त केला आहे.तसेच महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे.जेणेकरुन तरुणांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित,आदिवासी,महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठ वर्षात 8 कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे.या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत.आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे,अशी माहिती त्यांनी दिली आहे.










































































