Last Updated on 05 Nov 2021 5:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे.मिरज तालुक्यातील टाकळीतील मलेवाडी ओढ्यात दोन पारधी समाजातील तरुणी व एक बालिका ओढ्यात अंघोळीला गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.
आंघोळीसाठी गेलेली तिघींचा मृत्यू
मिरज तालुक्यातील टाकळी ओढ्यात दोन पारधी तरुणी व एक बलिकेचा बुडून मृत्यू झाला. टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली.
नंदिनी देवा काळे, मेघा चव्हाण काळे आणि स्वप्नाली टवळ्या पवार अशी तिघांची नावे आहेत. हे सर्व जण टाकळी येथील आंबेडकर नगरमध्ये राहतात. दुपारच्या सुमारास तिघी जणी अंघोळीला गेल्या होत्या. त्या परत न आल्याने घरच्यांनी शोध सुरू केला.
ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचले आणि तिघींचे मृतदेह बाहेर काढले.
घटनास्थळी पारधी समाजाच्या महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. तर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.









































































