Last Updated on 09 Feb 2022 7:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
शासन निर्णय क्रमांक: गृनियो: २०२०/प्र.क्र.७३/विजाभज-१/दिनांक: ११ जानेवारी, २०२१.
(300 KB)
शासन निर्णय क्रमांक गृनियो-2011/प्र.क्र.111/विजाभ-1, दिनांक 12 ऑगस्ट, 2014.
(165 KB)
योजनेचा उद्देश
- विमुक्त जाती व भटक्या जमातीचा विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे.त्यांचे राहणीमान उंचावे,त्यांचे उत्पन्न स्त्रोत वाढावे,त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे.
- यासाठी त्यांना जमिन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिकद्रष्टया स्वयंपूर्ण बनविणे.
योजनेच्या अटी
1)लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीवीका करणारे असावे.
2)लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
3) लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे.
लाभाचे स्वरूप
- ग्रामीण भागामध्ये 20 कुटूंबासाठी एक वसाहत निर्माण करणे. या वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेप्टींक टँक,गटारे व रस्ते अशा सुविधा पुरवणे.
- ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही, त्यास सदर योजनेचा लाभ देता येईल.
- ग्रामीण भागात पुरेशी जागा उपलब्ध होत असल्यास सामुहिकरित्या आणि जागा उपलब्ध होत नसल्यास वैयक्तीकरित्या सदर योजना राबविण्यात यावी.
- ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हयात सदरहू समाजाच्या लाभार्थ्यांना सामुहिकरित्या अथवा वैयक्तीकरित्या सदरहू योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
- सदर योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येतो. डोंगराळ भागातील लाभार्थ्यांकरीता रू.1.30 लक्ष आणि सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांकरीता रू.1.20 लक्ष इतके अनुदान देण्यात येते.
संपर्क
संबधित जिल्हयाचे सहायक आयुक्त.










































































