राजकारणात मोठं होण्याची स्वप्नं बघताना अनेकजण बाहेरच्या गोड बोलणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. पण खरी यशाची गुरुकिल्ली ही आपल्या घरच्या आणि हक्काच्या माणसांमध्येच दडलेली असते. राजकारणात टिकून राहायचं असेल, तर प्रथम आपल्या माणसांवर विश्वास ठेवणं अत्यावश्यक आहे.
घरची माणसं म्हणजे नुसते नातेवाईक नाहीत, तर ते आपले खरी पाठराखण करणारे असतात. संकटसमयी ज्यांचा हात आपल्या खांद्यावर असतो, निर्णयाच्या वळणावर जे प्रामाणिक सल्ला देतात, तीच खरी ‘आपली माणसं’. ही माणसं आपल्या यशातही निस्वार्थपणे सहभागी होतात आणि अपयशातही आपल्याबरोबर उभी राहतात.
आज राजकारणात अनेक ठिकाणी गोड बोलून फूट पाडणारे, स्वार्थासाठी घराघरात भांडणं लावणारे, आपली पोळी भाजून घेणारे ‘चतुर’ लोक फिरत आहेत. त्यांच्या सापळ्यात अडकून आपल्या मुळाशी कुऱ्हाड मारून घेणं, हे स्वतःचं नुकसान करून घेणं होय. त्यामुळे, अशा भूलथापांना बळी न पडता, आपल्या घरची ‘एकीची वज्रमूठ’ कायम ठेवणं फार गरजेचं आहे.
आपल्या घरच्या लोकांना विश्वासात घ्या, त्यांचं ऐका, त्यांच्या भावना समजा. कारण बाहेरच्यांना तुमचं यश हवं असेलच असं नाही, पण घरच्यांना तुमचं भलं नक्कीच हवं असतं.
यशाची वाट शोधताना घरच्या माणसांना विसरू नका, कारण घराचं बळ म्हणजेच तुमचं खरं भांडवल असतं.