राज्यात पावसाचा जोर ओसरला
मुंबई | भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि. 6 ऑगस्ट ) संध्याकाळी 6 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे
हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता 255 दलघमी) आत्तापर्यंत 457 क्युमेक्स विसर्ग
गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता 740.17 दलघमी) आत्तापर्यंत 3128.35 क्युमेक्स विसर्ग
भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता 304.10 दलघमी) आत्तापर्यंत 54.08 क्युमेक्स विसर्ग
दारणा (नाशिक) (एकूण क्षमता 202.44 दलघमी) आत्तापर्यंत 35.40 क्युमेक्स विसर्ग
दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता 679.11 दलघमी) आत्तापर्यंत 36 क्युमेक्स विसर्ग
राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता 219.97 दलघमी) आत्तापर्यंत 40 क्युमेक्स विसर्ग
ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता 564.05 दलघमी) आत्तापर्यंत 141 क्युमेक्स विसर्ग
बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता 183.94 दलघमी) आत्तापर्यंत 40 क्युमेक्स विसर्ग
निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता 216.87 दलघमी) आत्तापर्यंत 17.43 क्युमेक्स विसर्ग
वारणा (सांगली) (एकूण क्षमता 779.34 दलघमी) आत्तापर्यंत 45 क्युमेक्स विसर्ग
सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता 276.35 दलघमी) आत्तापर्यंत 18.40 क्युमेक्स विसर्ग
चासकमान (पुणे) (एकूण क्षमता 214.50 दलघमी) आत्तापर्यंत 31 क्युमेक्स विसर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
पुढील 24 तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पहाटे 3:53 वाजता व दुपारी 3:56 वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी 3.9 मीटर आणि दुपारी 4.5 मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.
नागरिकांनी आपत्तीं चा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.
राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:
फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL
ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra
अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900
ईमेल: controlroom@maharashtra.gov.in