थोडक्यात महत्वाचे…
या योजनेमुळे अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार
ब्रॉडबँड कनेक्शनमुळे ग्रामीण भाग सक्षम बनण्यास सुरुवात
भारतनेट प्रकल्पांतर्गत सध्या सुमारे 1.94 लाख गावे जोडली गेली
अडीच वर्षांत उर्वरित गावे जोडली जाण्याची शक्यता
नवी दिल्ली । देशातील प्रत्येक गावात ब्रॉडबँड इंटरनेट देण्यासाठी केंद्र सरकारने 1.39 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत.भारतनेट प्रकल्पांतर्गत देशभरातील 6.4 लाख गावांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाईल.भारतनेट प्रकल्पांतर्गत सध्या सुमारे 1.94 लाख गावे जोडली गेली आहेत आणि अडीच वर्षांत उर्वरित गावे जोडली जाण्याची शक्यता आहे.
ग्रामस्तरीय उद्योजक (VLEs),BSNL आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या मदतीने या गावांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट स्थापित केले जाईल. हा पथदर्शी प्रकल्प चार जिल्ह्यांतील गावांना जोडण्यासाठी सुरू झाला आणि नंतर त्याचा विस्तार 60 हजारपर्यंत करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुमारे 3 हजार 800 उद्योजक 60 हजार गावांसाठी पथदर्शी प्रकल्पात सामील होते,ज्यांनी 3.51 लाख ब्रॉडबँड कनेक्शन प्रदान केले.प्रति कुटुंब सरासरी डेटा वापर दरमहा 175 गीगाबाइट्स नोंदविला गेला आहे.BBNL आणि VLE मधील 50 टक्के महसूल वाटणीच्या आधारावर हा प्रकल्प सुरू केला जात आहे आणि मासिक ब्रॉडबँड योजना 399 रुपयांपासून सुरू होते.
देशात 37 लाख रुट किलोमीटर (RKM) ऑप्टिकल फायबर केबल (OFC) टाकण्यात आली आहे,ज्यापैकी BBNL ने 7.7 लाख रूट किलोमीटर टाकले आहेत.ब्रॉडबँड कनेक्शनमुळे ग्रामीण भागात सक्षम बनण्यास सुरुवात झाली आहे.जिथे लोक डॉक्टरांच्या मदतीने फोनवर उपचार घेऊ लागले आहेत.या प्रकल्पामुळे देशात 2.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.