सांगली । इस्लामपूर दुरवस्थेबाबत नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत 7 お होता. गेल्या काही महिन्यांत कसबे झाले. डिग्रज ते तुंगपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. संपूर्ण खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवणे चालकांसाठी जिकिरीचे काम होते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.सोशल मीडियावरही या रस्त्याची खिल्ली उडवली जात होती.
पेठनाका-सांगली हा मार्ग नेहमी वर्दळीचा आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा मार्ग आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीच या रस्त्याबाबत उदासीनता दाखवली आहे.या रस्त्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे तरीही हा विभाग नेहमीच काही ना काही कारणे देत जबाबदारी झटकत असल्याचे दिसत होता.
आजकाल पाणंद रस्त्यांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मिळत आहे.जिल्ह्यातील काही पाणंद रस्तेही या रस्त्यापेक्षा चांगले आहेत.नाहीतर पेठनाका-सांगली रस्ता…छे! हो, गड्या आपला पाणंद रस्ता बरा ! असे यानिमित्ताने म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले ! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या रस्त्याबद्दल नागरिकांच्या संतापजनक भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधोळ यांनी कसबे डिग्रज ते तुंग रस्त्याच्यां मार्गावरील मोठे खड्डे भरून घेण्यासाठी पॅचवर्कचे काम करून घेण्याचा निर्णय घेतला.नागरिक जागृती मंच आणि सर्वपक्षीय कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला होता.
आधीचे वृत्त येथे पहा…
प्रसिद्धी 14 ऑक्टोबर 2022