Last Updated on 03 Oct 2024 8:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । खो – खो या खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी (२०२५ मध्ये) भारतात होणार आहे. भारतीय खो- खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो- खो महासंघानं काल याबाबतची माहिती दिली.
या स्पर्धेत ६ महाद्वीपातील २४ देशांचा सहभाग असणार आहे. १६ पुरुष आणि १६ महिला संघ सहभागी होतील. ही स्पर्धा आठवडाभर चालेल.
या स्पर्धेमुळे या खेळाला असलेल्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. आधी मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो.
भारताची पारंपारिक खेळांमधील एक अनोखी ओळख असलेल्या ‘खो-खो’ खेळाला आता जागतिक स्तरावर नवा दर्जा मिळणार आहे. २०२५ मध्ये पहिल्यांदाच ‘खो-खो वर्ल्ड कप’ आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचे आयोजन भारतात होणार आहे. हा स्पर्धा खेळाच्या जागतिक पातळीवरील वाढीसाठी आणि भारताच्या सांस्कृतिक क्रीडा परंपरेला पुढे नेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुधांशू मित्तल यांनी आगामी कार्यक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, “पहिल्या खो-खो विश्वचषकाचे यजमानपदासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ही स्पर्धा केवळ स्पर्धेचे उदाहरण म्हणून काम करणार नाही तर देशांना एकत्र आणेल, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवेल आणि खो-खोचे सौंदर्य आणि तीव्रता जगाला दाखवेल. २०३२ पर्यंत खो-खोला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळणे हे आमचे अंतिम ध्येय आहे आणि हा विश्वचषक त्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.










































































