Last Updated on 10 Jun 2024 3:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!
आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”
याचा फायदा देशातील 8.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठकही आज होणार आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते,असे मानले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकार सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप करू शकते.
एका वर्षात मिळतात 6000 रुपये
2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्र किसन सम्मन निधी (पंतप्रधान-किसान) योजना पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करते. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते, जी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अंतरिम अर्थसंकल्पानुसार, सरकारने 2024-25 साठी कृषी मंत्रालयासाठी 1.27 लाख कोटी रुपयांचे बजेटचे वाटप केले आहे,जे 2023-24 आर्थिक वर्षापेक्षा थोडे अधिक आहे.जुलै 2024 मध्ये संपूर्ण बजेट जाहीर होण्याची शक्यता आहे.
28 फेब्रुवारी रोजी जरी केला होता 16 वा हप्ता
देशांतर्गत गरजा भागविण्यासाठी देशातील सर्व जमीन धारकांच्या कुटूंबियांना शेती व संबंधित काम पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान-किसान योजना सुरू करण्यात आली.ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती,परंतु डिसेंबर 2018 पासून प्रभावी झाली.यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसन सम्मन निधीचा 16 वा हप्ता जाहीर केला.16 व्या हप्त्यात 9 कोटी पेक्षा जास्त शेतकर्यांना 21 हजार कोटी पेक्षा जास्त रुपये देण्यात आले.










































































