उन्हाळ्यात अनेकजण माठातून पाणी पिणे पसंत करतात.माठातले थंडगार पाणी पिऊन तुमची तहान भागते.शिवाय निरोगी राहण्यासाठीही मदत मिळते.माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे.शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.म्हणून शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते.त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात.
कोणतेही हानिकारक रसायने नाहीत
बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.
नैसर्गिक थंडावा
लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.
मातीचे गुणधर्म
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.
मेटॅबॉलिझम सुधारते
माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.
उष्माघाताला आळा बसतो
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.
घशासाठी चांगले असते
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा.
आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे.. माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे असे म्हणतात.
१) माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो. पण माठातले प्यायल्याने दुखणार नाही. त्यामुळे माठातले पाणी पिउन गळ्याला आराम मिळेल.
२) उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते. माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात.उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.
३) माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच ते प्यायल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
४) माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.
३) माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते.तसेच ते प्यायल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
४) माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.