मुंबई । राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
दुर्गंधी आणि रोगराई फैलावू नये या दृष्टीनं मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये याबाबतचा प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता. या संदर्भात मार्गदर्शक सूचना आखलेल्या असून त्याच्या अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी दिलेल्या जागेला संरक्षण भिंत बांधून सुरक्षा व्यवस्था पुरवावी, प्राण्यांची अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घ्यावी, त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही, इतर आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ठाराविक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांना परवानगी द्यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आङेत.
पहिला प्रयोग ठाणे अन् मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये : पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येतोय. या दोन्ही महापालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या राखीव जागेमध्ये गॅस सौदाहिनीच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संयंत्र बसवण्यात आलेत, त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर इतर गोवंशीय पाळीव प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते. मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास, दुर्गंधी पसरून रोग -राई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागते.
पहिला प्रयोग ठाणे अन् मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये
पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येतोय. या दोन्ही महापालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या राखीव जागेमध्ये गॅस सौदाहिनीच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संयंत्र बसवण्यात आलेत, त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
स्रोत : शासन निर्णय