नवी दिल्ली :
आयसीसी टी-२० वर्ल्डकपची सुरूवात १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. सुरुवातीच्या लढती या पात्रता फेरीच्या असतील.त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल.या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना 24 ऑक्टोबर रोजी परंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताच्या पाहिल्या सामन्याची उत्सकता आता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये होणार आहे.
टी -20 वर्ल्ड कपचे सामने यूएई, ओमान, अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. 8 देशांचे क्वालीफाइंग मॅच 23 सप्टेंबरपासून सुरू होतील. क्वालीफाइंग मॅचच्या सामन्यात श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड सहभागी होणार आहेत. यावेळी सुपर 12 संघ 2 गटांमध्ये विभागले गेले आहे. सुपर-12 सामन्यांपूर्वी क्वालीफाइंग मॅच खेळले जाणार आहेत. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत.
पहिल्या फेरीत 8 संघ सुपर-12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबिया यांचा अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेश संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.
भारताचा ग्रुप 2 मध्ये समावेश
ग्रुप 2 मध्ये भारताचा समावेश आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामन्याने गट-2 मधील सामन्यांची सुरुवात होईल. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी शारजाहमध्ये पाकिस्तानचा न्यूझीलंडशी सामना होईल. सर्व ग्रुप सामने 8 नोव्हेंबर रोजी संपतील. A ग्रुपमधील दुसऱ्या नंबरवरील राउंड 1 टीमसोबत भारत क्वालिफायर सामना खेळेल.
भारताचे सामने असे रंगणार
भारत विरुद्ध पाकिस्तान – 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 31 ऑक्टोबर ,संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 3 नोव्हेंबर, संध्याकाळी 6 वाजता, अबुधाबी
भारत विरुद्ध B 1, 5 नोव्हेंबर – संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध A 2, 8 नोव्हेंबर – संध्याकाळी 6 वाजता, दुबई
विश्वचषकाआधी भारताचे सराव सामने
मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार होता. यातील पहिली लढत १८ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार होती. तर दुसरी लढत २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. आता मात्र भारताच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. टीम इंडियाची पहिली सराव लढत रद्द करण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया पहिली सराव लढत १८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर २० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत दुबईमध्ये होईल. भारताच्या सराव सामन्यातील लढतीचे मैदान देखील बदलण्यात आले आहे. या दोन्ही लढती दुबईच्या आयसीसी अकादमीच्या मैदानावर होतील. आधी या लढती दुबई आंतरारष्ट्रीय मैदानावर होणार होत्या.