कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक मतदान
मुंबई | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
हेही वाचा – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद – ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा – ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग– ५९.२३ टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के
हातकणंगले – ६८.०७ टक्के