Last Updated on 25 Oct 2021 1:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपराष्ट्रपती एम वेकैंय्या नायडू यांनी चित्रपट निर्मात्यांना केले आवाहन
आपली संस्कृती आणि परंपरा यांना धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट सिनेक्षेत्राने करू नये–उपराष्ट्रपती
नवी दिल्ली :
चित्रपटांमधून हिंसाचार, अश्लीलता आणि असभ्यतेला थारा न देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेकैंय्या नायडू यांनी चित्रपट निर्मात्यांना केले आहे. सिनेजगतातील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना प्रदान केल्यानंतर आणि विविध भाषांमधल्या चित्रपट अभिनेत्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते आज बोलत होते.चित्रपट म्हणजे उच्च उद्देश, सामाजिक आणि नैतिक संदेश देण्यासाठीचे साधन असावे असे त्यांनी सांगितले. चित्रपटातून हिंसाचाराचे ठळक दर्शन न घडवता सामाजिक अनिष्ट बाबीं विरोधात समाजाच्या नापसंतीचा आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आपली महान संस्कृती, परंपरा, मुल्ये यांना धक्का लागेल अशी कोणतीही बाब करू नये असे आवाहन त्यांनी सिने जगताला केले.
जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता ही भारताची सॉफ्ट पॉवर असल्याचा उल्लेख करत आपले चित्रपट जपान, इजिप्त, चीन, अमेरिका, रशिया, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगभरात पाहिले आणि नावाजले जातात असे ते म्हणाले. चित्रपटांना भौगोलिक आणि धार्मिक सीमा नसून चित्रपट सार्वत्रिक भाषा व्यक्त करतात. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगातल्या प्रतिभेचे, समृद्धतेचे आणि वैविध्याचेही दर्शन घडवतात. हवामान बदलाच्या वास्तवाचा उल्लेख करत, सिने जगताने, निसर्गाच्या जोपासनेचे महत्व अधोरेखित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कोविड-19 महामारीनेही आपल्याला निसर्गाचे महत्व जाणवून दिल्याचे ते म्हणाले.
या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल रजनीकांत यांचे त्यांनी अभिनंदन केले. रजनीकांत यांची आगळी शैली आणि अभिनय कौशल्याने भारतीय चित्रपट उद्योगाला नवा आयाम दिल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. मुन्द्रू मुदिचू, शिवाजी: द बॉस, वायथीनिले, बैरवी या चित्रपटातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांचा उल्लेख करत थलैवा यांनी कलात्मक अभिव्यक्ती आणि सर्वसामान्यांना भावेल असा अभिनय असा उत्तम समतोलाचा आविष्कार घडवला असे ते म्हणाले.
सर्वोच्च चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार सिक्कीम या राज्याने पटकावला.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एस मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, फीचर्स फिल्म्स ज्युरीचे अध्यक्ष एन. चंद्रा, कथाबाह्य चित्रपट ज्युरी अध्यक्ष अरुण चढ्ढा इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
त्याचबरोबर इतर विजेत्यांची यादी खाली दिली आहे
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: मारक्कर अरबिकादलिंते सिहम (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: बहतर हुरैन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कंगना रणौत (मणिकर्णिका, पंगा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी भोंसले आणि धनुष असुरन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: द ताश्कंद फाईल्स, पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: सुपर डिलक्स, विजया सेतुपती
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट: कस्तुरी (हिंदी)
दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट नवोदित चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार: हेलन (मल्याळम)
विशेष उल्लेख: बिर्याणी (मल्याळम), जोनाकी पोरुआ (आसामी), लता भगवान करे (मराठी), पिकासो (मराठी)
सर्वोत्कृष्ट तुळु चित्रपट : पिंगारा
सर्वोत्कृष्ट पाणिया चित्रपट: केंजिरा
सर्वोत्कृष्ट मिशिंग फिल्म: अनु रुवाड
सर्वोत्कृष्ट खासी चित्रपट: लेवदुह
सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट: छोरियां छोरों से कम नहीं होती
सर्वोत्कृष्ट छत्तीसगढ़ी चित्रपट: भुलन द मेझ
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट: जर्सी
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: असुरन
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट: रब दा रेडिओ २
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: साला बुधर बदला आणि कालिरा अटिता
सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट: इगी कोना
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: कल्ला नॉटम
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: बार्दो
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट: काजरो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट: अक्षी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: छिछोरे
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: गुमनामी
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: रोनुवा- कोण कधीही शरण जात नाही
सर्वोत्कृष्ट स्टंट: अवने श्रीमन्नारायण (कन्नड)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: महर्षी (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट विशेष प्रभाव: मराकर अरेबिकदालिन्ते सिंहम (मल्याळम)
विशेष ज्युरी पुरस्कार: ओथथा सेरुप्पू आकार -7 (तमिळ)
सर्वोत्कृष्ट गीत: कोलाम्बी (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन गाणी: विश्वासम (तमिळ)
संगीत दिग्दर्शन: ज्येष्ठोपुत्रो
सर्वोत्कृष्ट मेकअप कलाकार: हेलन
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईन: आनंदी गोपाल
सर्वोत्कृष्ट संपादन: जर्सी (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: लेवडु (खासी)
सर्वोत्कृष्ट पटकथा मूळ पटकथा: ज्येष्ठोपुत्री
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा: गुमनामी
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: ताश्कंद फाईल्स (हिंदी)
सर्वोत्कृष्ट छायांकन: जल्लीकट्टू (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: बर्दो (मराठी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: केसरी, तेरी मिट्टी (हिंदी)
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: जल दफन
सर्वाधिक चित्रपट-अनुकूल राज्य: सिक्कीम
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: एक गांधी प्रकरण: संजय सुरी यांचे सिनेमातील प्रेमाचे भारताचे उत्सुक चित्रण
विशेष उल्लेख- अशोक राणे लिखित सिनेमा पहारा मानुस आणि कन्नड सिनेमा: जगथिका सिनेमा विकास-प्रेरणे प्रभाव लिखित पीआर रामदासा नायडू)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: सोहिनी चट्टोपाध्याय














































































