सांगली । इस्लामपुर नगरभुषण स्व.एम.डी.पवारसाहेब यांनी शहरातील कोल्हाटी समाजाला कायम आश्रय दिला, १९३८ पासुन हा समाज शहरामधील मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात वास्तव्यास आहे. या समाजाच्या जागेचा व घरांचा प्रश्न येणार्या काही दिवसात कायमस्वरुपी सोडविण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते निशिकांत भोसले – पाटील यांनी दिली.
आज इस्लामपुर शहरातील कोल्हाटी समाज बांधवांनी त्यांच्या रहिवाशी जागा व कायम बांधीव पक्क्या घरासंदर्भातील प्रश्नासाठी निशिकांत भोसले-पाटील यांची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते,यावेळी जेष्ठ समाजप्रमुख वसंत जावळे, शंकर जावळे, विलास जावळे, भिमराव जावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले’ शहरातील कोल्हाटी समाजबांधवांचे शहरातील विकासात मोलाचे योगदान आहे,शहरातील मार्केट कमिटी स्थापन व्हायच्या आधीपासुन म्हणजे जवळपास ८० वर्षाहुन अधिक काळ हे बांधव या शहरामध्ये राहात आहेत. अलिकडील काळात त्यांचे अनेक प्रश्न नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत.या समाज बांधवांचा कोणाला हक्क हिरावुन घेऊन स्वार्थ साधुन देणार नाही.त्यांचे पुर्नवसन करुन कोण त्या जागेवर आपल्या स्वप्नातील उद्योग उभा करत असेल तर ते स्वप्न पुर्ण होऊ देणार नाही. समाज बांधवांच्या मागणीनुसार त्यांचे कोणत्याही परिस्थितीत पुर्नवसन होऊ देणार नाही. आहे त्या ठिकाणी त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी कटीबध्द आहे. माझ्या व्यक्तीगत, राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर योग्य ती मदत करणार असुन कोणत्याही समाजबांधवांनी घाबरुन जावु नका मी तुमचे हक्काचे घर होत नाही तोपर्यत तुमच्याबरोबर आहे. असा विश्वास शेवटी निशिकांत भोसले- पाटील यांनी दिला.यावेळी अनेक समाजबांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या.
मार्केट कमिटीच्या दालनात बैठक
यावेळी कोल्हाटी समाजातील बांधवांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्या व्यथा चे गांभीर्य लक्षात घेऊन निशिकांत भोसले-पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांना थेट दुरध्वनी करुन कोल्हाटी समाज बांधवांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नाही. तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन यांच्याशी बोलुन घ्या गुरुवार किंवा शुक्रवारचा वेळ निश्चित करुन मला सांगा. मी स्वत:कोल्हाटी समाज बांधवांच्या प्रश्नासाठी तुमच्या दालनात येणार आहे असा संवाद साधला. यावेळी निशिकांतदादांच्या खंबीर व सकारात्मक भुमिकेमुळे कोल्हाटी समाजबांधवांना मोठा धिर आला.
यावेळी माजी नगरसेवक भास्कर कदम, अशोकराव खोत, अजित पाटील,अक्षय पाटील, केशव जावळे, शंकर जावळे, पांडुरंग जावळे, श्रीपती लाखे, पांडुरंग लाखे, बाबुराव जावळे, कोंडीराम जावळे, चंद्रकांत जावळे, सुरेश जावळे, लहु जावळे, जयवंत जावळे, संदीप जावळे, निवास जावळे, राहुल जावळे, अजय जावळे, अरुण जावळे, मारुती लाखे, किरण लाखे, विकास जावळे, रवि जावळे आदींसह अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते