सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चारही युनिटच्या गळीत हंगाम सन २०२५-२६ च्या तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ साखराळे येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माजी जि.प. अध्यक्ष व संचालक देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, माजी मंत्री आ.जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा गळीत हंगाम निश्चित यशस्वी करू. ऊस तोडणी व वाहतूकदारांचे काही प्रश्न असल्यास ते सोडविले जातील. आपण जास्तीत-जास्त ऊस पुरवठा करावा.
शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले, गेला गळीत हंगाम थोडासा उशीरा चालू झाला आणि १०० दिवसात संपला. यावर्षी कारखाना वेळेत चालू करून १२० दिवसापेक्षा जास्त दिवस चालविण्याचा प्रयत्न राहील. सर्व घटकांनी सहकार्य करावे.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली म्हणाले, सध्या साखर उद्योगासमोर अनेक संकटे उभा आहेत. गेल्या ६ वर्षापासून साखर विक्रीचा दर वाढलेला नाही. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसबिले,तसेच तोडणी वाहतुकीची बिले दिली आहेत.
यावेळी रामभाऊ माळी, महादेव माळी, अर्जुन कचरे, कुमार पाटील,शहाजी पाटील, सोनाजी सदगर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच रमेश जाधव, विनोद पाटील, संग्राम पाटील, गुणवंत पाटील, संभाजी कामेरीकर, संदीप डांगे, सुभाष मस्कर, दीपक जगताप, वृषभनाथ पाटील यांच्यासह अनेक प्रातिनिधिक करार करण्यात आले.
बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे,संचालक प्रताप पाटील, शैलेश पाटील, दादासो मोरे, बबन थोटे, दिपक पाटील, रामराव पाटील, रमेश हाके, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, वैभव वसंतराव रकटे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव डी.एम.पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.