पौष महिना खरंच अशुभ आहे का?
नमस्कार…!
मी ज्योतिषशास्त्री प्रभाकर जंगम
पौष महिन्यातील मुहूर्तासंदर्भात अनेक जणांचे मला फोन येतात…पौष महिन्यात आम्ही नूतन गृहारंभ करू शकतो का? विवाहादी बोलणी इ. मंगल कार्य करू शकतो का?… काही वेळा गैरसमजुतीतून-गैरसमजाची परंपरा तयार होते आणि त्याचं रूपांतर रूढी आणि प्रथेमध्ये होताना दिसतं…तर असो…!
नुकताच पौष महिना सुरू होत आहे आणि पौष महिन्याच्या मुहूर्तांसंदर्भात अनेक गैरसमज आहेत…!
पौष महिन्यात मंगल कार्य करू नये, नवीन व्यवहार करू नयेत असा समज आहे तो चुकीचा आहे. फक्त विवाहासाठी मकर संक्रातीनंतरचा पौष महिना घ्यावा असे एक मत आहे. तर मतांतराने संपूर्ण पौष महिना विवाहास घ्यावा असे सुद्धा आहे. वास्तुशांती, गृहप्रवेश, बारसे, डोहाळे जेवण,साखरपुडा, नवीन खरेदी इत्यादी सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी संपूर्ण पौष महिना शुभ आहे असे विचार दाते पंचांगकर्त्यानी धर्मशास्त्र रूढी समज-गैरसमज या पुस्तकात ही मांडले आहेत.
तसेच ग्रंथात भूमिपूजन, पायाभरणी, गृहारंभ, वास्तुशांती इत्यादीसाठी पौष महिना हा सर्वात चांगला सांगितलेला असताना कदचित नववधुने सुनं पाळण्यासाठी माहेरी राहावे या नियमावरून परंपरा सुरू झाली असावी असे मला वाटते, कारण सगळ्याला एकच नियम लावून गैरसमजूतीची परंपरा तयार होते.
उदा. दक्षिण दिशा अशुभ पण दक्षिण दिशा अशुभ आहे असे कोणत्याहीे वास्तुशास्त्राच्या प्रमाणभूत ग्रंथात सांगितलेलं नाही. उलट दक्षिण दिशेला महाद्वार ठेवा असं सांगितलेलं आहे. अर्थात शास्त्रांमध्ये दक्षिण दिशेत विशिष्ट कप्प्यामध्ये ते द्वार शुभ सांगितले आहे. जसे उत्तर दिशा कुबेराची आहे म्हणून उत्तरेकडील द्वार शुभ आहे असे नाही तर त्यासाठी देखील उत्तरेकडचा काही विशिष्ट कप्पा शुभ सांगितला आहे. अर्थात त्या भागामध्येच प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे तरच ते शुभ अन्यथा बाकी इतर कोणत्याही भागात ते उत्तरेकडे असून देखील अशुभ आहे. तसे…
पंचांगकर्त्याने देखील ग्रंथांचा अभ्यास करूनच पौष महिन्यामध्ये पंचांगात विविध मुहूर्त दिले असतानाही काही मंडळी विवाह बोलणी नव्हे तर विवाह हा शब्द देखील या महिन्यात उच्चारत नाहीत….तर हे अगदीच चुकीचं आहे.
तसेच काही गोष्टी, काही नियम शास्त्रात पाळायला सांगितले असले तरी त्या वेळची परिस्थिती त्यावेळच्या काळानुसार ते सांगितलेले आहेत. ते नियम काळाबरोबर बदलणे -अपडेट होणे ही आवश्यक आहे.
उदा. सध्याच्या काळात पौष, आषाढ, जेष्ठ या महिन्यात सूनं पाळणं म्हणजे सुनेने पौष महिना पाळण्यासाठी माहेरी राहणं कितपत योग्य आहे?
तर याचे उत्तर नाही असं आहे .
कारण काही गोष्टी काळानुसार बदलणं आवश्यक आहे.
पूर्वी स्वयंपाकासाठी चूल वापरत होतो आता आपण गॅस शेगडी वापरतो.
पूर्वी प्रवासासाठी टांगा -बैलगाडी वापरत होतो आता आपण फोर व्हिलर – अगदी विमानापर्यंचा प्रवास आपण स्वीकारलेला आहे. मोबाईलचे व्हर्जन देखील आपण वरचेवर अपडेट करतो.
तसेच शास्त्र देखील काळानुसार बदलणं आवश्यक आहे. अपडेट होणे आवश्यक आहे. तसे या प्रमाणे…आधुनिक काळात सद्यस्थितीला नूतन वधूने पौष पाळण्यासाठी माहेरी राहणं आवश्यक आहे का ?
याचे उत्तर आहे…नाही…!
या विषयसविस्तर विचार २१ व्या शतकातील काल सुसंगत आचारधर्म या ग्रंथात – दाते पंचांग कर्ते यानी याविषयी सविस्तर विचार मांडलेत आहेत.
नववधू विवाहानंतर प्रथम वर्षी येणाऱ्या आषाढ मासात सासरी राहिल्यास सासूला वाईट तसेच ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ दीराला वाईट, पौष महिन्यात सासऱ्याला वाईट अधिक म्हणजे मलमासात पतीला वाईट असल्याने त्या त्या महिन्यात संपूर्ण महिना त्या त्या महिन्यात सासरी राहू नये म्हणजेच माहेरी राहावे असे सांगितले आहे. पण हा विचार आता कालबाह्य झालेला आहे. कारण पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाचे वय आठ ते बारा वर्षाचे असायचे. त्या लहान वयात संसार वैवाहिक सूख या गोष्टींशी त्या मुलीचा संबंध नसायचा. आईची माहेरची ओढ असल्याने त्या त्या महिन्यात माहेरीत जाऊन आईकडून काही गोष्टी शिकता याव्यात. तसेच सुरुवातीला काही काळ सासरी आणि काही काळ माहेरी राहण्याची ती एक व्यवस्था म्हणून हा नियम सांगितला असावा. सध्याच्या काळात मुलीचे विवाहाचे वय, नोकरी करणाऱ्या मुली याचा विचार करता महिनाभर माहेरी राहू शकत नाहीत. त्यामुळे हा विचार व हे नियम आता कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळे हे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?