चंद्राचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताने चंद्राची परिक्रमा करणारी, त्याच्या पृष्ठभागाचे वारंवार निरीक्षण करणारी दोन रोबोटिक अंतराळ यान पाठवून आपली क्षमता दाखवून दिली आणि 2008 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा चौथा देश बनला.त्यानंतर 2009 मध्ये चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला.चांद्रयान-2 मिशनचे ऑर्बिटर गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अभ्यास करत आहे. आता 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणाने अंतराळ संशोधन प्रवासातील एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे.चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून चांद्रयान-3 जगातील पहिल्या मोहिमेचा इतिहास रचायला सज्ज…
चांद्रयान-3: चंद्राच्या रहस्यांचा शोध
प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता झाले.
23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 ला लँडिंगचे लक्ष्य
खर्च सुमारे 615 कोटी रुपये
चांद्रयान -3 एक लँडर,एक रोव्हर आणि एक प्रॉपल्शन मॉड्यूल ने सुसज्ज आहे.
3,900 किलोग्रॅम वजन आहे.
एलएमव्ही 3 एम 4 रॉकेट ने 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (एसडीएससी), एसएचएआर येथील दुसऱ्या प्रक्षेपण (लाँच) पॅडवरून उड्डाण केले आणि चांद्रयान-3 ला यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केले. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे की, अंतराळ यानाची स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबद्दल भारताच्या वैज्ञानिकांच्या अथक समर्पणाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला आहे.प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावून उंच भरारी घेतली आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. मी त्यांच्या भावना आणि प्रतिभेचे अभिनंदन करतो. ” 3,00,000 किलोमीटरहून अधिक अंतर कापून ते चंद्रावर पोहोचेल. चांद्रयानवरील वैज्ञानिक उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील आणि आपले ज्ञान वाढवतील.पंतप्रधान मोदी म्हणाले,“अंतराळ क्षेत्रात भारताचा इतिहास खूप समृद्ध आहे.
जागतिक चांद्रमोहिमांमधील एक पथदर्शक मानले जाते कारण यामुळे चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याला दुजोरा मिळाला आहे. हे जगभरातील 200 हून अधिक वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे.” ही उल्लेखनीय मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल. अमेरिका, सोव्हिएत संघ आणि चीन हे तीनच देश चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहेत. चंद्रावर उतरल्यावर भारत चंद्राचा शोध घेणाऱ्यांच्या या सन्माननीय गटात स्थान मिळवेल.
चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 मधून मिळाली विशेष मदत
चांद्रयान-1 मोहिमेपर्यंत चंद्राला पूर्णपणे कोरडा, भूवैज्ञानिक दृष्ट्या निष्क्रिय आणि निर्जन खगोलीय ग्रह मानले जात होते. आता पाणी आणि त्याच्या उप-पृष्ठभागावर बर्फ असल्यामुळे गतिशील आणि भूवैज्ञानिक दृष्ट्या सक्रिय खगोलीय ग्रह म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. भविष्यात त्यावर राहण्याची शक्यता देखील असू शकते .
चांद्रयान-2 शी जोडलेल्या ऑर्बिटरच्या डेटा ने प्रथमच रिमोट सेन्सिंगद्वारे क्रोमियम, मँगनीज आणि सोडियम असल्याचा शोध लावला होता. चांद्रयान 2 च्या प्रमुख वैज्ञानिक परिणामांमध्ये चंद्रावर सोडियम असल्याचा पहिला जागतिक नकाशा, खड्ड्यांच्या आकाराबाबत अधिक माहिती , आयआयआरएस उपकरणासह चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्यामुळे तयार झालेल्या बर्फाचा स्पष्ट शोध लावणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. या मोहिमेबद्दल सुमारे 50 प्रकाशनांमध्ये माहिती प्रकाशित झाली आहे.
आत्मनिर्भर भारताचे आत्मनिर्भर अंतराळ क्षेत्र
देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान 2024 मध्ये पाठवण्यास भारत सज्ज
जगभरातील 34 वेगवेगळ्या देशांचे 424 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले
इस्रोने गेल्या 5 वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह व्यावसायिकरित्या प्रक्षेपित केले आहेत. यातून सुमारे 94 दशलक्ष डॉलर्स इतके परकीय चलन मिळाले आहे.
भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा पहिला देश बनला
धोरणांमधील सुधारणांमुळे अंतराळ क्षेत्रातील उड्डाणांमध्ये विस्तार, खाजगी कंपन्यांना परवानगी,उद्योगासाठी इस्रोच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करता येणार
खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र IN-SPACe स्थापित
इन-स्पेस, न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांना मदत
IN-SPACe च्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन , या मंचावर सुमारे 120 अंतराळ स्टार्टअप्स नोंदणीकृत
भारताला स्वयंपूर्ण आणि अंतराळ क्षेत्रातले जागतिक नेतृत्व बनवण्यासाठी इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) चा पुढाकार
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय अंतराळ धोरण 2023 ला मंजुरी दिली, ज्यामध्ये खाजगी कंपन्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल.
सरकारी संस्थांची भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या
भारताच्या पीएसएलव्हीने विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांचे 36 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.