सांगली । सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय बहे सर्व सहकारी संस्थेच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी अध्यक्ष जयदीप पाटील होते.
संस्थेची वार्षिक सभा शांततेत पार पडली.संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याला मान्यता देण्यात आली.97 व्या घटनादुरुस्तीनुसार वाढलेले भागभांडवल व सभासद संख्या यामुळे सदस्य संख्या 13 वरून 17 करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या कोर्ट केसीसबाबत निर्णय घेण्यासाठी 5 सभासदांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.संस्थेच्या सभासदांसाठी कृषी सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय देण्यात आला.
यावेळी विठ्ठलराव पाटील म्हणाले,सभासद हा केंद्रबिंदू मानून संस्थेचे कामकाज सुरु आहे.संस्थेचा आलेख नेहमी चढता राहिला आहे.यापुढे सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.सभासदांसाठी नाव नवीन उपक्रम राबविण्यात येतील.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील,माजी अध्यक्ष विलासराव पाटील,हणमंतराव पाटील,कृष्णेचे संचालक अविनाश खरात,सीताराम हुबाले,बाबुराव हुबाले,अजित थोरात,धोंडीराम पवार,अरविंद थोरात,जालिंदर देशमुख,उपाध्यक्ष भीमराव कुंभार,वसंतराव पाटील,प्रा.शशिकांत पाटील,सयाजी पाटील,सर्जेराव दमामे,मालोजी शिंदे,हौशेराव भोसले,शहाजी पाटील,अशोक देशमुख,अरविद थोरात,संभाजी पाटील,वैभव पाटील,सुधीर रोकडे,कालिदास पाटील,मछिंद्र पाटील,दिनकर पाटील,अधिक बडवे तसेच सर्व आजी-माजी संचालक,सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना माजी अध्यक्ष संजय हुबाले,अध्यक्ष जयदीप पाटील,विट्टलराव पाटील व संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली.अध्यक्ष जयदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.नोटीस व अहवाल वाचन सचिव सुधाकर मोहिते यांनी केले.रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.